शक्यतांतून निवडीचे स्वातंत्र्य घेऊ इच्छिणारे, निवडलेल्या शक्यतेसाठी झगडण्याची जिद्द असलेले, कष्ट घेऊन तिला मूर्त स्वरुपात आणू पाहणारे, भविष्याकडे बघत वाटचाल करतात. त्यातून नवनिर्मितीचा, यशाचा आनंद आणि परिपूर्तीचे समाधान ते उपभोगू शकतात.
उलट भूतकाळाबाबत शक्यता अस्तित्वात नसतात, तिथे फक्त वास्तवात उतरलेल्या शक्यतेची नोंद असते. त्याबाबत वर्तमानात काहीच बदल करता येत नसतो, करावा लागत नाही. तिला आहे तसे स्वीकारावे लागते. त्यासाठी कोणतेही कष्ट वा संघर्ष करावा लागत नाही. म्हणून कर्तृत्वशून्य नि आळशी जमात भूतकाळात रमते! इतरांनी कढवलेले तूप आयते वाढून घेते.
- बाबा रमताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा