-
गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग ‘ज्यांचा एकच कान काळा आहे, असे आठशे पांढरेशुभ्र घोडे’ गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो सम्राट ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा(?) तोडगा त्यावर काढला. ‘रुपगुणाची खाण’ अशी ख्याती असलेली आपली कन्या ‘माधवी’ त्याने गालवाला दिली नि ‘तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील’ असा सल्ला त्याला दिला. पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की, ‘ति… पुढे वाचा »
गुरुवार, २ जून, २०१६
आपलं आपलं दु:ख
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
