Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

पौरुषाचा कांगावा


  • महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्‍या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »

सोमवार, १७ जुलै, २०२३

जम्प-कट - ७ : एकाधिकार ते विनिमय-व्यवहार


  • अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध) « मागील भाग --- एकाधिकार नागर आयुष्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या हा माणसाचा शेजार आहे. आपल्या मालकाबरोबर फिरायला आलेल्या पाळीव कुत्र्याने आपल्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण केल्याच्या भावनेतून त्याच्यावर खच्चून भुंकणार्‍या या टोळ्यांसोबत सहजीवन माणसाने स्वीकारले आहे. दोन प्रतिस्पर्धी शेजारी टोळ्यांमध्ये रात्री-अपरात्री भडकणार्‍या हद्दीच्या लढायांचे आपण जागृत(!) साक्षीदार असतो. लांडग्यांचा समूहघोष अधिकारक्षेत्राची निश्चिती आणि संरक्षण हा अतिप्राचीन काळापासून प्राणिजीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुत्र्यांप्रमाणेच माकडांच्या, लांडग्यांच्या वा जंगली कुत्र्यांच्या टोळ्यांचे प्रदेश त्यांनी आखून घेतलेले असतात. वाघ-सिंहादी मार्जारकुलातील प्राण्यांमध्येही ही हद्द… पुढे वाचा »

बुधवार, १४ जून, २०२३

जम्प-कट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)


  • अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध) « मागील भाग --- Pope Francis addresses the crowd before delivering his Easter message from the main balcony of St. Peter’s Basilica at the Vatican on 16th April 2017 . जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून बरीच मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे असे गृहित धरणे सोयीचे असते. काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात… पुढे वाचा »

रविवार, ४ जून, २०२३

जम्प-कट - ५ : अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)


  • कुटुंबव्यवस्था आणि वारसा « मागील भाग --- मानवाच्या टोळीजीवनाच्या काळात त्याचे आयुष्य भूक, भावना आणि भय या तीनच बाबींभोवती बांधलेले होते. भूक अन्नाने भागवली जात होती. टोळीजीवनामध्ये आपल्या टोळीतील व्यक्तींबाबत बांधिलकी, आपलेपण तर अन्य टोळीतील व्यक्तींबाबत द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व या भावना असत. माणसाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नसंपादन, आहारसिद्धता याबाबत लेखमालेच्या मागील भागांमध्ये विवेचन आलेले आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजव्यवस्था विविध संक्रमणातून जात असतानाची स्थित्यंतरेही नोंदवलेली आहेत. या भागामध्ये मानवी जीवनात असलेले भय आणि त्या अनुषंगाने देव संकल्पनेची उत्पत्ती नि तिचा पुढील प्रवास याबाबत उहापोह केलेला आहे. भयवाटेने प्रवेश माणूस जंगलजीवी, टोळीजीवी असताना भय त्याला अनेक वाटांनी भेटीस येत असे. … पुढे वाचा »

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

जम्प-कट - ४ : कुटुंबव्यवस्था आणि वारसा


  • टोळी ते समाज आणि माणूस « मागील भाग --- खाण तशी माती, झाड तशी कैरी जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’ तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच… पुढे वाचा »