-
( प्रेरणा: कुसुमाग्रजांची `खुनशी सुरे’ ही कविता )
भरचौकात एका सुर्याने एका माणसाची हत्या केली पोलिसाच्या हाताने मग त्या सुर्याला अटक केली. सुरा धरणारा हात म्हणे, ’खून करणारा सुराच, त्याच्यावर माझे काहीच नियंत्रण राहिले नाही*.’ कलम धरलेल्या हाताने सुरा धरलेल्या हाताचा युक्तिवाद मान्य करत त्याला निर्दोष मुक्त केला. दशकांनंतर निकाल आला सुरा संपूर्ण दोषी ठरला ’मरेपर्यंत वितळवण्याची शिक्षा हवी’ जमाव गर्जला. ’असे समाजविघातक सुरे अशांतीचे दूत असतात.’ म्हणत कलमवाल्या हाताने त्यावर शिक्का उमटवला. सुर्याच्या शिक्षेसाठी मग सुरा बनवणारा हात आला ’नव्यांसाठी हा कच्चा माल’ म्हणून जुना घेऊन गेला समारंभपूर्वक त्याने मग सुरा भट्टीत झोकून दिला ’शांतिदूत हा’ बघ्यांनी- त्यावर पुष्पवर्षाव केला वितळल्या सुर्यांमधून अनेक नवे तयार केले. सुरा धरणार्या हातांनी, मोल मोजून घरी नेले. त्या सुर्याचे रक्त आता नव्यांमधून वाहात आहे सुरा धरणारे हात मात्र त्यामुळे निश्चिंत आहेत. - रमताराम
- oOo -* भारतात अतिशय गाजलेल्या खटल्यातील एका डरपोक आरोपी नेत्याचा युक्तिवाद.
गुरुवार, ९ जुलै, २०२०
खुनी सुरा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Chan lihilay gurji...lay avadli
उत्तर द्याहटवाThanks a lot. _/\_
हटवा