त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले 'There I spoke, here I remain silent'
---
त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले
'याची जीभ कापा, पाच लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले
'याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
यांच्या ’संन्यासी’ नेत्या म्हणाल्या
'त्यांना' पुरे निखंदून काढा
...
ते काहीच म्हणाले नाहीत
त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली
'त्या' लोकांना गो़ळ्या घाला
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला
'ते' सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
त्यांची वानरसेना म्हणाली
सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
दुष्काळाने त्रस्त जनता म्हणाली
पाणीपुरवठ्याचे काहीतरी करा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
शेतकरी कळवळून म्हणाले
'पाच वर्षे दुष्काळ आहे, कर्ज माफ करा'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
सुरकुतलेली भुकेली तोंडे म्हणाली
'डाळीचे भाव परवडत नाहीत हो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...
त्यांच्या 'उच्चशिक्षित' सहकारी म्हणाल्या
विरोधकांना चुटकीसरशी संपवीन
...
आणि...
’बोलूकाका’ बोल बोल बोलले.
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा