-
(बातमी: 5.4-magnitude quake hits South Shetland Islands ) --- मोदींच्या भाषणांमुळेच हे झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींनी ‘आम्ही भारतातून हाकललेली काँग्रेसची गेल्या सत्तर वर्षांतील पापे तिकडे जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे’ भूकंप झाल्याचा प्रतिटोला दिला. ‘तेथील एका नागरिकाने मोदींवर टीका केल्यामुळे ईश्वरानेच त्यांना शिक्षा दिली’ असे रविशंकरप्रसाद भक्तिभावाने ट्विट करते झाले. आपल्या पक्षाचा एकमेव सदस्य असलेल्या कम्युनिस्टाने ‘समाजवाद्यांनी संघाशी केलेल्या छुप्या युतीचे तिथे गाडलेले पुरावे बाहेर येण्यास यातून मदत होईल’ अशी आशा व्यक्त केली. कन्हैयाकुमारने ‘भूकंप से आजादी’ अशी नवी घोषणा दिली. पुण्यातील दक्षिण-पूर्व समाजवादी गटाने कलेक्टर कचेरीसमोर पंधरा मिनिटे घोषणा देऊन अंटार्क्ट… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
द. शेटलँड बेटावर भूकंप...
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
नाचत ना...
-
(काव्यशार्दुल गोविंदाग्रज यांना स्मरून ) नाचत ना भाजपात, आता । राकाँच्या कळपात, नाथा ॥ आणिक होती, चिकी मावशी (१) । तावडेंची उलघाल, नाथा ॥ खुर्ची उलटली, सत्ता हरपली । काकांच्या फटक्यात, नाना ॥ तो तर वरती, नवबिहारी (२) । सर्व हताश पाहात, नाना ॥ --- गीत: काव्यकार्टुन संगीत: आताबास्कर संगीत मंडळी गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल) नाटक: सं. खुर्चीप्रभाव राग: मुन्शिपाल्टी कानडा चाल: उद्धवा नेऊ नको नाथास … पुढे वाचा »
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ‘मल्ल्याला सल्ला’)
-
https://blogs.navbharattimes.indiatimes.com/ येथून साभार. (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून ) अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्यापरी ॥ ध्रु.॥ काय बोलले जन हे, विसरुन तू जा सगळे, जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी ॥ १ ॥ लाज नको पळताना, खंत नको स्मरताना काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी ॥ २ ॥ राख लक्ष स्वप्नांची, हतबल त्या गरीबांची, तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्यावरी ॥ ३ ॥ - मजेत पेडगांवकर - oOo - --- संबंधित लेखन: अशी ही पळवापळवी >> अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >> --- पुढे वाचा »
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
मुंबईत वीज गेली...
-
मुंबईत वीज गेली म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले पंजाबमधील शेतकर्यांना पाठिंबा देणारा नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला. कंगनाने ट्विट करुन त्यातील व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे यावर कम्युनिस्ट विचारवंताने एकशे तेरावा लेख लिहिला आणि सायक्लोस्टाईल करुन आपल्या मित्रांना पाठवला माहिती अधिकाराचा वापर करुन मोराच्या पिसांची संख्या राहुल गांधीनी माहिती करुन घेतली कपिल सिब्बल यांनी त्याबाबत सोनियांकडे तक्रार केली आपले तिकिट कापण्यामागे मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा गुप्त … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)



