अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्यापरी
काय बोलले जन हे,
विसरुन तू जा सगळे,
जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी
लाज नको पळताना,
खंत नको स्मरताना
काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी
राख लक्ष स्वप्नांची,
हतबल त्या गरीबांची,
तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्यावरी
- मंदार पेडगांवकर (ऊर्फ मंदार काळे)
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा