-
स्थळः कुण्या एका घाटातील एक अनामिक, पण नयनरम्य धबधबा काळः ऐन पावसाळ्याचा प्रसंग १: दिवसः आठवड्याअखेरचा वेळः ऐन दुपारची ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन चार मिनीबसेस, पाच सहा ‘कॉर्पिओ’ आणि आठ दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल, याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो, गाडी पार्क करताना ऐकू येणारी ‘सारे जहाँसे अच्छा’ ही रिवर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट ‘टू मिनिट नूडल्स’ तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या. एक रोमँटिक जोडी ध… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २५ जुलै, २०१७
एका धबधब्याचे विधिलिखित
गुरुवार, १३ जुलै, २०१७
अरे सेन्सॉर सेन्सॉर...
-
(बहिणाईची क्षमा मागून...) अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर, आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हनू नही अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हनू नही । अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनं बिचनं येड्या पायातली व्हान, म्हनू नको रे तोरन । अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल एक खुळं म्हनं गोड, बाकी सार्याले अकाल । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्हनू नको रे बहावा, त्याले नही पान फूल, वाजि होयबाचा पावा । देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागर गोटे । ऐका सेन्सॉर सेन्सॉर, निर्हा पदाचा इचार, देते खोट्याले होकार, अन् खर्याले नकार । देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार । अरे सेन्स… पुढे वाचा »
सोमवार, २९ मे, २०१७
गीता कपूर, ‘हल्लीची पिढी...’ वगैरे
-
आज गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने – नेहमीप्रमाणे सनसनाटी – बातमी केली आहे. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे ‘हल्लीची पिढी...’ या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळू लागली आहेत. एकतर आपली मानसिकताच ‘एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच’ अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. ‘अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे’ किंवा ‘तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे’ हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, रोजगार-क्षेत्र, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. आईबाप नेहेमी बिच्चारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वै… पुढे वाचा »
बुधवार, ४ जानेवारी, २०१७
आपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा...?
-
( प्रसिद्ध समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी फेसबुकवर << हे भलतंच काय झालंय आपलं? >> असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या अनुषंगाने मांडलेला हा विचार, एकाच वेळी सर्व बाजूंचा मार खाण्याबद्दल ख्याती असणार्या रमतारामांचा .) ...हे आपल्यापुरतं प्रत्येकाने तपासून पहायला हवं. ज्यांचा “माझ्या गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग समर्थनीय आहे, पण ‘त्यांच्या’ गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग मात्र समर्थनीय नाही ” असे उघड विषमतावादी, वर्चस्ववादी मत आहे, त्यांचा मुद्दा मी सोडून देतो. निदान ते आपल्या एकांगी भूमिकेशी प्रामाणिक तरी आहेत. पण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा उद्घोष करतात, आपली न्यायबुद्धी जिवंत असल्याचा किंवा आपण समतोल विचाराचे असल्याचा दावा करतात, त्यांच्यासाठी हा वरचा प्रश्न आहे . प्रश्न अगदी वाजवी आहे. ‘आपण’ बदललो, आपण वाहव… पुढे वाचा »
सोमवार, १९ डिसेंबर, २०१६
चलनमुक्त समाज आणि इतिहास (सहलेखक: अॅड. राज कुलकर्णी)
-
चलनातून पाचशे नि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या नागरिकांच्या अर्थव्यवहारावर होऊ शकणार्या संभाव्य परिणामांबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत. परंतु अशा प्रकारची व्यवस्था सामाजिक पातळीवर काही बदल घडवू शकेल का, हे पाहणेही आवश्यक ठरेल. हा मुद्दा उपस्थित करण्याला ऐतिहासिक आधार आहेत, आणि इथे त्यातील एका पैलूचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसीत होवू लागली तसतशी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपलिकडे माणसाच्या गरजांची संख्या वाढू लागली. आपल्या गरजेच्या सर्वच वस्तू आपापल्या निर्माण करण्याऐवजी, एकेका उत्पादनाची जबाबदारी एका व्यक्तीला वा समू… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
अर्थकारण,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक
रविवार, ४ डिसेंबर, २०१६
सर्वेक्षणांचे गौडबंगाल
-
कार्ल मार्क्सचा सहाध्यायी फ्रेडरिक एंगल्सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या दारुण अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल लिहून समाजनिर्मितीत सर्वेक्षणावर आधारित मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची प्रस्थापित व्यवस्था संख्याशास्त्राचे नियम आणि मूल्यमापन पद्धती धुडकावत, जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याचे डावपेच रचत आहे. नोटाबंदीनंतर सर्वेक्षणांतून झालेले फसव्या जगाचे दर्शन हे त्याचेच द्योतक आहे... --- वृत्तपत्रे, चॅनेल्स, इन्टरनेट पोर्टल्स यांच्यामार्फत अनेक सर्व्हे घेण्यात येतात. उदा. ‘सलमान खान दोषी आहे असे तुम्हाला वाटते का?’ किंवा ‘अमीर खान असहिष्णुतेबद्दल जे म्हणाला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का?’ वगैरे. त्याचे निकालही लगेच लाईव्ह दिसत असल्याने, आपले मत बहुसंख्येबरोबर गेले किंवा नाही हे ही लगेच तपासता येते… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक,
संख्याशास्त्र
शनिवार, ३ डिसेंबर, २०१६
दक्षिणायन अनुभवताना
-
( मडगांव, गोवा इथे नुकत्याच पार पडलेल्या ‘दक्षिणायन’ अधिवेशनाला माझ्यासह काही मित्र हजर होते. त्यासंबंधी ‘आंदोलन’ मासिकासाठी लिहिलेला हा लहानसा वृत्तांत .) गेल्या तीन-साडेतीन वर्षांत विवेकवादाच्या, पुरोगामित्वाच्या तीन अध्वर्यूंची हत्या झाली, आणि भारतातील सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली. परंपरेचा उद्घोष करत, शत्रूलक्ष्यी मांडणी करत अनेक गटांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात नंगा नाच सुरू झाला. एफटीआयआयसारख्या संस्थांपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली नि या उन्मादी गटांना बळ मिळत गेले. आम्ही सांगू तेच बोला, आमच्या विरोधात जाईल असे बोलू नका अन्यथा तुमचा ‘दाभोलकर करू’ किंवा ‘कलबुर्गी करू’ अशा उघड धमक्या सुरू झाल्या. विचारांचा लढा लढणारे पुरोगामी या हिंसक मार्यापुढे काहीसे हतबुद्ध झाल्यासारखे भासले. जरी नेते सावरले तरी कार… पुढे वाचा »
रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६
... कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे
-
ताई, तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले, आम्हाला कळलंही नाही. आम्ही विचारलं, ‘असं का?’ तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे. दादा, तुम्ही गावात कारखाना काढू म्हटला. पुन्हा आमच्या जमिनी घेतल्यात. म्हटलात आमच्या पोराबाळांना नोकरी देऊ. कास्तगारी करून स्वाभिमानाने जगणारी आमची पोरं, हातात दंडुका घेऊन दारात टाकलेल्या खुर… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







