-
‘उठी उठी गोऽपाऽलाऽऽऽ आ... आ... अ...’ कोणीतरी केकाटू लागला. ‘तिच्यायला सकाळी सकाळी हे कोण केकाटून कुमारांच्या सुंदर गाण्याची वाट लावतंय’ असं पुटपुटत रामू अंथरुणातून धडपडत उठला नि सवयीने रिमोटकडे हात गेला. रिमोटचे बटण दाबूनही आवाज बंद होईना, हे बघून वैतागला. इतक्यात त्याला आठवले की टीवी नव्हे, तर मुख्य प्रधानाच्या आदेशाने आपल्या घरात प्रविष्ट झालेला रेडिओ कोकलतो आहे. मध्ययुगातील रेडिओ आता डिजिटल झालेला असल्याने, त्याचे बटन पिळून बंद करताना त्याचा कान पिळल्याचे दुष्ट समाधानही मिळत नाही, हे ध्यानात येऊन तो अधिकच वैतागला. धडपडत कसातरी टचस्क्रीन रेडिओ अनलॉक करून त्याने आवाज बंद केला. ‘च्यामारी या मुख्य प्रधानाच्या, गोबेल्सने रेडिओ वापरला त्याला शंभर वर्षे झाली. तंत्रज्ञान बदलले तरी, या बाबालाही रेडिओच हवा म्हणे. आणि हे कसले खूळ, तर म्हणे रोज… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५
गो-मॅन-गो (कथा)
Labels:
कथा,
जिज्ञासानंद,
वक्रोक्ती,
समाज,
साहित्य-कला
रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५
विचारहीन झुंडीचे माध्यमशास्त्र
-
‘विचारवंतांवर, लेखकांवर कोणतीही बंधनं आली, की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते.’ - दुर्गा भागवत. गेल्या काही दिवसांत साहित्यिकांची पुरस्कार परत करण्याची ‘अहमहमिका’ अनेकांना टोचली आहे. माध्यमांच्या विस्फोटामुळे, आणि ते लोकांना सतत व्यक्त होण्यास भाग पाडत असल्याने, आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे कितीही निर्बुद्ध विधानांना कुठे ना कुठे प्रसिद्धी मिळत असल्याने, निरर्गल व्यक्त होण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. तर्क, मूल्यमापनाची शून्य समज असलेलेही दिग्गजांवर बेमुर्वत शेरेबाजी करताना दिसतात. अख्लाकला घेरून मारणार्या जमावाचीच एक आवृत्ती सोशल मीडियांतून बस्तान बसवू लागलेली आहे. अनेक सुज्ञांना आपण अशा एका झुंडीचा भाग आहोत, हे जाणवतही नाही इतका धुरळा बुद्धिभेद करणार्यांनी उडवून दिलेला दिसतो आहे. … पुढे वाचा »
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५
गण्या आणि मी - २: गण्याचे ग्यान
-
आमचा सातवी पास असलेला गण्या हुशार आहे. माझ्या तर्कातल्या चुका तो अचूक काढतो आणि मला जमिनीवर आणत असतो. आता हेच पहा ना, परवा कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात म्हणे ‘सनातन’च्या कुण्या कार्यकर्त्याला अटक झाली. आपला होरा बरोबर ठरला, म्हणून पुरोगामी म्हणवणारे माझ्यासारखे खुश झाले. “बघ आम्ही म्हणालो तेच बरोबर ठरले की नाही.” गण्याकडून आमची नेहेमीची, बदनामीपुरती खाण्याची पानपट्टी घेता घेता मी त्याला ऐकवले. फडक्याला हात पुसता पुसता गण्या क्षणभर थबकला, मग माझ्याकडे ढुंकूनही न पाहता समोर ठेवलेले पान उचलून त्याला चुना फासू लागला. चुना, कात वगैरे लावून झाल्यावर आवश्यक ती पंचद्रव्ये त्यात टाकून त्याने ते पान ‘शीलबंद’ केले आणि आधीच लावून ठेवलेल्या सुमारे तीसेक पानांच्या ओळीत जोडून दिले. पुन्हा एकदा फडक्याला हात पुसता पुसता तो म्हणाला, “तुम्ही पुरो… पुढे वाचा »
रविवार, २० सप्टेंबर, २०१५
‘हार्दिक’चा राजकीय तिढा
-
हार्दिक पटेल या बावीस वर्षांच्या युवकाने भारतातच नव्हे, तर जगभरात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या पटेल-पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेले काही दिवस आंदोलन चालवले आहे. या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांच्या सर्वशक्तिमान होऊ पाहणार्या नेतृत्वाला त्यांच्या राज्यातूनच आव्हान मिळाल्याने, त्यांच्या आणि पर्यायाने भाजप सरकारच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होतील, याबद्दलही बोलले जात आहे. आंदोलनाचा मुद्दा ‘जात’ या घटकाशी निगडित आहे आणि म्हणून त्याच्या यशापयशाचा परिणाम गुजरातमधे आणि एकुणच देशाच्या सामाजिक परिस्थितीवर कसा घडेल याचा अभ्यास अनेक समाजशास्त्रज्ञ करतीलच. पण देशाच्या राजकारणावरील दीर्घकालीन परिणामांचा विचार होताना मात्र दिसत नाही. भारतीय राजकारणावरच्या दूरगामी परिणामाचा विचार करताना द… पुढे वाचा »
शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५
नासा म्हणे आता
-
या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं ‘नासा’च्या सूत्रांनी जाहीर केले आहे. त्यातून जे वाचतील त्यांना नोव्हेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे! नासाने मर्मेड्स अथवा मत्स्य-स्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून, नासाच्या आण्विक संशोधकांनी गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते. नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे. नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. … पुढे वाचा »
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५
‘शेष’प्रश्न
-
( हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे. तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही .) सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात ‘पुरोगामी दहशतवाद’ असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि ‘स्वतःला पुरोगामी म्हणवणारी’ मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे. परंतु असे असले तरी मोरेंबद्दल माझा आक्षेप आहे, तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्या विधानाबद्दल आहे, आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे.… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
पुरोगामित्व,
प्रासंगिक,
भूमिका,
राजकारण
रविवार, ३० ऑगस्ट, २०१५
सत्तेचे भोई
-
आठ ऑगस्ट रोजी बंगालमधील ‘काँग्रेस छात्र परिषदे’चा कार्यकर्ता असलेल्या कृष्णप्रसाद जेना या विद्यार्थ्याची प्रतिस्पर्धी ‘तृणमूल छात्र परिषद’ या तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचे कारण काय होते तर, तृणमूल काँग्रेसचे मंत्री सौमेन महापात्र यांच्या स्वागतासाठी आला नाही! हे महापात्र महाशय त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी म्हणून आले होते. तरीही त्यांना आदरसत्काराची हौस होती, की नेत्यावर छाप पाडण्यासाठी कार्यकर्तेच अति आक्रमक होते हे सांगता येत नाही. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्याइतके बेभान होण्यात शासन धार्जिणे असण्याचा आधार नक्कीच कामी येत असणार. यावर शासन आणि विद्यापीठ संलग्न व्यक्तींच्या प्रतिक्रिया अतिशय संवेदनशून्य होत्या… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण,
समाज
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५
गण्या आणि मी - १ : गण्याचे गणित
-
मी आणि गण्या एकाच हापिसात काम करतो. मी शाळेत गणितात हुशार नि गण्या त्या विषयात ढ. पण इतिहासाने आणि समाजशास्त्राने मला दगा दिला, आणि पाठांतर-प्रवीण गण्याने नेमक्या त्या विषयांत भरपूर मार्क्स काढले नि तो पुढे गेला. आता तो हेडक्लार्क आहे आणि मी त्याच ऑफिसला प्यून आहे. तसं म्हटलं तर आमचं हे दोघांचंच ऑफिस. हे दहा बाय दहाचं ऑफिस आणि बाहेरच्या भिंतीवर पाच बाय पाच आमच्या ऑफिसच्या नावाची पाटी. आमचं हेडऑफिस अमेरिकेला आहे. आमचा बडा साहेबही तिकडेच बसतो. तो तिथून आमच्या दोघांवर नियंत्रण ठेवून आहे. मागच्या वर्षी गण्याला महिन्याला ८३ हजार रुपये होता आणि मला चौदा हजार. यावर्षी बड्या साहेबांनी मला तेहेतीसशे रुपयाची पगारवाढ दिली आणि गण्याला तेरा हजार रुपयांची. आता गण्याचा पगार शहाण्णव हजार झाला आहे तर माझा साडेसतरा हजार. … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







