-
वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता « मागील भाग यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पोटामागे विस्थापित झालेल्या, विखंडित झालेल्या टोळ्या विखुरल्या. विविध भूभागांवर पसरलेल्या या गटांचा वारसा समान होता, कर्मकांडांत साम्य होते. पुढे धर्मसंस्थांनी अमूर्त अशा नीतिकल्पनांच्या आधारे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या गटांनाही बांधिलकीचा वसा देऊन नवी टोळी बांधली. पुढे धर्माने राजकीय व्यवस्थांना ताब्यात घेण्यासाठी स्वत:ची सैन्ये उभारली, काही वेळा आपले धर्मदूत पाठवून टोळीत नसलेल्यांना टोळीत सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला नि त्यायोगे बहुसंख्या प्रस्थापित करुन राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. धर्माधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्ती, ज्यू नि मुस्लिम सत्तालोलुपांच्या रक्तरंजित संघर्षाने - ज्यांना ‘क्रूसेड्स’ (crusades) असे म्हटले जाते - इतिहासाचे… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ८ : धर्म आणि सहजीवन
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
मालिका,
व्यवस्था,
समाजजीवन
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
-
समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती « मागील भाग रोजगार आणि बेरोजगारी मागील भागात म्हटल्याप्रमाणे चलनामुळे विनिमयाची देवाण नि घेवाण ही दोन अनुषंगे सुटी होऊन खरेदी नि विक्री हे व्यवहार स्वतंत्र झाले. एक बाजू चलन सांभाळू लागले. त्याचबरोबर केवळ चलनच देऊ करणारे ‘रोजगार’-क्षेत्र उदयाला आले . ज्यातून आधी केवळ चलन-संचय करून, प्रत्यक्ष गरजांचा विचार त्यानंतर– त्या संचयाच्या परिघात करण्याचे नवे बंधन निर्माण झाले. व्यापाराप्रमाणेच हा रोजगार टोळी वा समाजाच्या परिघातून मुक्त झाला . अन्य समाजातील व्यक्ती वा व्यक्तिगटांसोबत व्यवहार, रोजगार करूनही चलन मिळवणे शक्य झाले. विनिमयाने सैल केलेली सामाजिक वीण चलनाने पुरी उसवून टाकली. इतके झाल्यावर अर्वाचीन महानागरी समाजामध्ये जोडीदाराची निवडही समाजाचे बंधन उल्लंघून होऊ लागली. जन्माने बांधलेल्या माणसांच्या… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
मालिका,
व्यवस्था,
समाजजीवन
रविवार, ९ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
-
सहजीवन आणि अर्थकारण « मागील भाग https://www.globaltimes.cn/ येथून साभार. Operations Research या विषयातील Optimizationच्या अभ्यासामध्ये Objective function नावाची संकल्पना वापरली जाते. जगण्यातील समस्या, अडचणी सोडवत असताना आपले उद्दिष्ट (Objective) निश्चित करावे लागते. मग ते साध्य करण्याच्या दृष्टीने, आपल्या कुवतीच्या मर्यादेत अधिकाधिक परतावा देणारी नियोजन नि कृती निश्चित करता येते. मर्यादित साधने वा गुंतवणूक यांच्या मर्यादेत एकाच वेळी अनेक उद्दिष्टे साध्य करता येत नसतात, त्यातील कुणाला किती प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागते. Objective function हे प्राधान्य निश्चित करत असते. व्यवसायाला सुरुवात करताना प्रथम एका लहानशा प्रमाणात सुरू करून टप्प्याटप्प्याने विस्तार करत न्यावा, की अंबानींच्या ज… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
मालिका,
व्यवस्था,
समाजजीवन
रविवार, २ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ५ : सहजीवन आणि अर्थकारण
-
संग्रह ते व्यापार « मागील भाग जंगलजीवी, शिकारजीवी, शेतीजीवी मानवाचे सहजीवन अनायासे, सेंद्रिय पद्धतीने विकसित झालेले होते. पुढे टोळीविघटनाने, स्थलांतरामुळे विविध चालीरीती नि कर्मकांडाचेही स्थलांतर झाले. एक प्रकारे त्यांच्याशी निगडित टोळ्यांचे एक प्रकारे विकेंद्रीकरण झाले. भौगोलिक अंतराने दुबळे झालेले बंध दृढ करण्यासाठी म्हणा वा नव्याने टोळ्यांची मोट बांधण्यासाठी म्हणा, धर्मसंस्थेने अमूर्त नीतिनियमांच्या कल्पनांच्या आधारे विकेंद्रित टोळी, समाज बांधला. परंतु विनियम, व्यापाराने विकेंद्रीकरण होऊ लागले नि टोळ्यांचे बंध सैल होऊ लागले. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे शिकार नि शेती यांनी अनायासे सहजीवी व्यवस्थांकडे वाटचाल झाली. व्यापाराचे मात्र तसे नाही. त्याच्या व्याख्येतच परस्परावलंबी नसणार्या दोन व्यक्ति, व्यक्तिसमूह यांनी केलेली देवाण-घेवाण अभ… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
मालिका,
व्यवस्था,
समाजजीवन
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



